Sunday, June 18, 2017

औक्षवंत हो, भाग्यवंत हो, शहाणा हो आणि एकदाचा पास हो!!

एवढी सगळी गदळ चालू आहे...ते कोण बुरहान वणी का कोण ते आकाशात गेले, उरी मधे हल्ला झाला आणि १८ सैनिक गेले. शरीफ म्हणतात काश्मिर आमचा..मोदी म्हणतात बलुचिस्तान वेगळा आहे..
असे म्हणतात की वाघ शिकारीला बाहेर पडला की माकडे दंगा करून रान हादरून सोडतात. इथे एवढ्या मोठ्या मोठ्या शिकारी होऊन देखील मर्कटसेना शांत कशी याचे राहून राहून आश्चर्य वाटते.
शबाना आझमी, शोभा डे, शहारूख, राज बब्बर, ओवेसी, मार्कंडेय काटजू सारेच कसे शांत शांत झाले आहेत. कमाल आहे..काहीतरी नक्कीच घडले आहे. किंवा हे लोक काहीतरी विपरीत घडायची वाट पाहत आहेत.
अमिरखान आणि किरण राव पण काही बोलत नाहीत हल्ली..सारे सारे सहिष्णू झाल्यासारखे वाटत असावे..वणीचा स्वर्गाचा मार्ग मोकळा झाला त्याचा आनंद आहेच. शिवाय बरोबरीने १८ सैनिक मेल्यामुळे, आता सहिष्णूता लवकर परत येणार याचा देखील आनंद झालेला दिसतोय दांपत्याला!!
पण मला कळत नाही कि एवढे सगळे मायंदाळ चालू असून आमचा कन्हैय्या आणि त्याचे "लाल" घेवडे मित्र, येचुरी, करात बाई असे गप्प गप्प कसे? अगदी स्टॅलिन मेल्यासारखे गप्प आहेत!! आश्चर्य आहे. "लाल" घेवडे मित्र चीनच्या आदेशाची वाट पहात असावेत. आणि आमचा कन्हैय्या, शेवटी एकदाचा अभ्यासाला लागलेला दिसतो!! आनंद आहे.
औक्षवंत हो, भाग्यवंत हो, शहाणा हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदाचा पास हो!!

No comments:

Post a Comment