काल गिरान जळून गेली
चुलान कोन घालनार ....
वात फर फर करू लागली
गळा कोन काढनार ....
गाव सोडलं गावकी सोडली
ह्या गिरनी साटी भावकी मोडली ...
जमीन गेली गाय गेली
मागल्या साली माय बी गेली ...
जुनी फाटकी चिंदी लेवून
पोरं गुमान धाव धावली ...
मुंबई गिरनी घाव घालून
कंबर कना पिचवून गेली....
फुटकं मडकं राहिलय शिल्लक
त्यात पानी किती असनार ??
करून बघ प्रेयत्न
पर आता जौल नाही इजनार ....
इजली तर इजल वात
पर आता जौल नाही इजनार ....
आता जौल नाही इजनार ....
Wednesday, April 7, 2010
Subscribe to:
Posts (Atom)