Friday, March 27, 2015

प्रिय अटलजी

तुम्हाला भारतरत्न मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन!! आज वर अनेकांना हा पुरस्कार मिळाला आहे. पण मला असे वाटते कि आज त्या पुरस्काराचाच सन्मान झाला आहे. 

माझ्या पिढी मधल्या कित्येक लोकांना आज आनंद झाला असेल. तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी आहात. सर्व समावेशक नेते आहात. अणुस्फोट करण्याची हिंमत बाळगणारे शक्तिशाली प्रशासक आहात. कारगिल मध्ये पाकिस्तान ला चारी मुंड्या चित करणारे धुरंधर सेनापती आहात. हे सगळे असूनही तुमच्या कडे मेणाहून मऊ असे कवीचे अंतकरण आहे. तुमचे वक्तृत्व भारून टाकते तर तुमच्या कविता गहिवरून टाकतात. आज तुमचीच एक कविता आठवली आणि २ शब्द लिहावेसे वाटले. 

क्या खोया क्या पाया जग में । मिलते और बिछडते मग में ।
मुझे किसी से नही शिकायत । यद्द्यपि छला गया पग पग में । 
एक दृष्टी बीती पर डाले । यादो कि पोटली टटोले ।
अपने हि मन से कुछ बोले । अपने हि मन से कुछ बोले ।

जन्म मरण का अविरत फेरा । जीवन बंजारो का डेरा ।
आज यहां कल वहां कूच है । कौन जानता किधर सवेरा ।
अंधियारा आकाश असीमित । प्राणो के पंखो को तोले ।
अपने हि मन से कुछ बोले । अपने हि मन से कुछ बोले ।

अटलजी तुम्ही अदम्य आहात. अगम्य आहात. सावरकरांनी सांगीतलेले देशभक्तीचे मंत्र तुम्ही जन्मभर जगला आहात. 

भारतमाता जर कुठे खरेच असेल तर आज तिच्याही डोळ्यात पाणी आले असेल!!   

पुन्हा एकदा अभिनंदन !!